मनमाडला दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विकृतावर गुन्हा दाखल!

मनमाड (प्रतिनिधी): दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर फुटीप्रकरणी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, या प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या यशाचे औचित्य साधून मनमाड शहरातील सर्व समविचारी पक्षांच्या वतीने एकत्र येत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान, या आनंदोत्सवानंतर मनमाड येथील राजू डगळे या जातीयवादी विचारसरणीच्या व्यक्तीने व्हॉट्सॲपवर दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह आणि जातीयवादी वक्तव्य केले. या विकृत कृत्यामुळे शहरात सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती.या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहर अध्यक्ष विलास आहिरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी भीमसैनिक गुरू निकाळे, रवि निकम, ऍड. प्रमोद आहिरे,अमोल केदारे आंनद अंकुश यांचे समवेत तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या राजू डगळे याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करायला लावला व आरोपीस अटक करण्यास भाग पाडले.
विलास आहिरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या या तत्परतेमुळे शहरातील सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून राहण्यास मदत झाली असून, समाजकंटकांवर योग्य ती कारवाई झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























