Homeमनमाडनांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र

​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा (स्टॉपेज) आणि प्रवाशांच्या इतर सोयी-सुविधांशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी खासदार भास्कर मुरलीधर भगरे यांना दिले आहे.गेल्या दोन वर्षांपासून खासदार भगरे हे मनमाड गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू व्हावी व कोरोना काळात नांदगाव स्थानकावर बंद केलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी पत्रव्यवहार करत आहेत
खासदार भास्कर भगरे यांनी २२ मार्च २०२६ रोजी नांदगाव रेल्वे स्थानकावरील समस्यांविषयी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले होते. २२ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या पत्राद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदारांच्या पत्राची दखल घेतल्याचे स्पष्ट केले. खासदार भगरे यांनी उपस्थित केलेल्या विषयांची सखोल तपासणी/चौकशी केली जात असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती सकारात्मक कारवाई केली जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.नांदगाव हे परिसरातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने येथे अनेक द्रुतगती (Express) गाड्यांना थांबा मिळावा, अशी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रोजच्या प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. खासदार भास्कर भगरे यांनी या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधल्यानंतर आता स्वतः रेल्वेमंत्र्यांनी यावर कारवाईचे संकेत दिल्याने, लवकरच नांदगाव रेल्वे स्थानकावर नवीन गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
​या निर्णयामुळे नांदगाव आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

मनमाडची गोदावरी एक्सप्रेस पुन्हा धावणार…?
मनमाड शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील चाकरमाण्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी एक्सप्रेस धुळेकरांनी पळवून नेली याविषयी अनेक आंदोलन झाले अनेक वेळा शिष्टमंडळाने भेटी घेतल्या यात खासदार भास्कर भगरे यांनीही निवडून आल्यापासूनच या विषयावर अनेकदा पत्रव्यवहार केले आहेत याशिवाय रेल्वे मंत्र्यांच्या भेटी घेऊन गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असुन लवकरच मनमाडकराची हक्काची गोदावरी एक्सप्रेस पुन्हा धावणार असे चित्र दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

“व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार” “युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान”- सुरज...

0
“व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार" "युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान”- सुरज गुंजाळ   मनमाड(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या...

विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल; अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध...

0
विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल; अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार मुंबई(प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

“व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार” “युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान”- सुरज...

0
“व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार" "युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान”- सुरज गुंजाळ   मनमाड(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या...

विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल; अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध...

0
विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात बदल; अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार मुंबई(प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता...
error: Content is protected !!