नांदगाव व मनमाड परिसरामध्ये उष्णतेचा कहर; तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
मनमाड(आवेश कुरेशी ) : नांदगाव तालुक्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून आज नांदगाव शहरासह मनमाड आणि संपूर्ण तालुक्यामध्ये उष्णतेचा मोठा कहर पाहायला मिळाला. आज या परिसरामध्ये तब्बल ४२ अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण परिसर होरपळून निघाला असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली होती सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज दिवसभर हवामान अंशतः ढगाळ होते. ढगाळ वातावरण आणि कडक ऊन या दोन्हीच्या एकत्र परिणामामुळे हवेतील उकाडा प्रचंड वाढला आहे. कमाल तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने नागरिकांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागत आहे.यामुळे हवेची गुणवत्तादेखील खालावली उष्णतेच्या तीव्रतेसोबतच नांदगाव परिसरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. आज एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तब्बल ३४९ वर पोहोचला असून, तो ‘अतिशय वाईट’ या श्रेणीमध्ये नोंदवला गेला आहे. प्रदूषित हवा आणि वाढते तापमान यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना मोठा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागरिकांसाठी प्रशासकीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन वाढती उष्णता आणि हवेची खराब गुणवत्ता पाहता नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळा अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून भरपूर पाणी, लिंबू पाणी किंवा ताक प्यावे.मास्कचा वापर करा हवेची गुणवत्ता खराब असल्यामुळे बाहेर पडताना तोंड आणि नाक रुमालाने किंवा मास्कने झाकून घ्यावे.तालुक्यात सध्यातरी उष्णतेची हीच लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख






























