Homeब्रेकिंगजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; मनमाडमध्ये अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; मनमाडमध्ये अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; मनमाडमध्ये अवजड वाहनांची घुसखोरी सुरूच
मनमाड(अजहर शेख ) :- नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनमाड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत इंदूर-पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी करण्यात जिल्हा वाहतूक पोलीस  स्थानिक वाहतूक पोलीस सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात अवजड वाहने बिनदिक्कतपणे शिरत असल्याने “जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला किंमत आहे की नाही?” असा संतप्त सवाल सामान्य मनमाडकर विचारत आहेत.यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य व वाहतूक कोंडीने त्रस्त मनमाडकर करत आहेत.
                मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असुन मनमाड शहरांतून इंदूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो यामुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे याचा फटका हा येवला शहरालाही बसतो  यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात बैठक बोलावली व यावर उपाय म्हणून या महामार्गावर दिवसा सकाळी ६ ते १० पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद केली मात्र या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला जिल्हा वाहतूक पोलीस व स्थानिक वाहतूक पोलिसांनी केराची टोपली दाखवली असुन शहरात दिवसाही अवजड वाहनांची खुलेआम वाहतूक सुरू आहे यामुळे मनमाड व येवला शहरात रोज वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक कोंडीला त्रासलेल्या नागरिकांनी आता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला काही किंमत आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
या आहेत महत्वाच्या समस्या
◆आदेशाचे उल्लंघन: जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते रात्री १० ही वेळ निश्चित केली असतानाही अवजड वाहने शहरात येत आहेत.
वाहतूक पोलिसांची भूमिका: वाहतूक पोलीस पर्यायी मार्गाने वाहने वळवण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कोंडीचा विळखा: अवजड वाहनांमुळे शहरातील मुख्य चौक आणि रस्ते तासनतास जाम होत आहेत.
◆अपघाताची भीती: अरुंद रस्त्यांवरून मोठी वाहने जात असल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मनमाड येवला येथील नारिकांचा संताप
शहरातील व्यापारी आणि पालकांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शाळेच्या बस आणि रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसत आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन पोलीसच करणार नसतील, तर जनतेने दाद कोणाकडे मागायची?” असा प्रश्न मनमाड व येवला शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...
error: Content is protected !!