Homeताज्या बातम्यामनमाडमधील ६०० गोरगरीब अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्यास आमरण उपोषण करणार; सामाजिक कार्यकर्ते रवींद्र...

मनमाडमधील ६०० गोरगरीब अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्यास आमरण उपोषण करणार; सामाजिक कार्यकर्ते रवींद्र निकम यांचा प्रशासनाला इशारा

मनमाड(प्रतिनिधी):मनमाड नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील सुमारे ६०० गोरगरीब, हातमजूर आणि छोट्या व्यवसायिकांवर करण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते आणि कायद्याचे अभ्यासक रवींद्र चंद्रकांत निकम यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी आमदार सुहास कांदे, मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे.

​”प्रशासनाने गालात मारली तरी चालेल, पण पोटावर मारू नका!”

​दिलेल्या निवेदनात रवींद्र निकम यांनी म्हटले आहे की, कोरोना काळानंतर देशातील आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती. मनमाडमध्ये कोणतीही मोठी एमआयडीसी किंवा रोजगाराची साधने उपलब्ध नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत अनेक गोरगरीब नागरिक, कष्टकरी आणि हातमजूर रस्त्याच्या कडेला छोटी-मोठी टपरी, हातगाडा किंवा स्टॉल लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आता कुठे त्यांचे व्यवसाय थोडेफार रुळावर येत असताना, प्रशासन पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे हटवून ६०० कुटुंबांना रस्त्यावर आणण्याचे काम करत आहे.

​”प्रशासनाने अतिक्रमण धारकांच्या गालात मारली तर चालेल, पण त्यांच्या पोटावर मारू नका,” अशी भावनिक साद निकम यांनी प्रशासनाला घातली आहे.

 

​लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांवर नाराजी

​नगरपालिकेने यापूर्वीच जनरल मिटिंगमध्ये अतिक्रमण काढण्यासंबंधीचा ठराव मंजूर केला असून, कोणती अतिक्रमणे काढायची याचे व्हिडिओ शूटिंगही पूर्ण केले आहे. यावर तीव्र आक्षेप घेत निकम यांनी म्हटले आहे की, ज्या गोरगरीब जनतेने मतदान करून नगरसेवकांना निवडून दिले, तेच नगरसेवक आज या कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देणारा ठराव मंजूर करत आहेत, हा सर्रास अन्याय आहे. त्यांनी सर्व नगरसेवकांना असे ठराव न घेण्याची विनंती केली आहे, जेणेकरून कष्टकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही.

​आमदार सुहास कांदे यांना हस्तक्षेप करण्याची विनंती

​मनमाडकरांच्या वतीने रवींद्र निकम यांनी स्थानिक आमदार सुहास (अण्णा) कांदे यांना साकडे घातले आहे. “कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांनी या विषयात तात्काळ हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना ही कारवाई थांबवण्याचे आदेश द्यावेत,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

​’प्रशासन जबाबदार राहील’ चा इशारा

​६०० छोट्या व्यापाऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतल्यास त्यांच्या संपूर्ण परिवारावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे ही नोटीस आणि कारवाई तूर्तास स्थगित करावी. जर प्रशासनाने ही कारवाई बळजबरीने पुढे रेटली, तर गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आपण स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसू. या आंदोलनादरम्यान आपल्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा थेट इशारा रवींद्र चंद्रकांत निकम यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीला धोका निर्माण झाला आहे

0
पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्ता हा कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा गहाळ दुवा मानला आहे. 2019...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

0
अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

0
मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी   मनमाड(प्रतिनिधी) : - मनमाड शहरात नगरपरिषदेच्या वतीने सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम वेगाने राबवली जात...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

0
पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

0
एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

4-5 मिनिटे वाचवण्यासाठी प्रस्तावित रस्त्यामुळे वेताळ टेकडीला धोका निर्माण झाला आहे

0
पुणे: पुणे महानगरपालिकेने अर्ध्या दशकाहून अधिक काळ प्रस्तावित बालभारती-पौड फाटा रस्ता हा कोंडीत सापडलेल्या शहरी वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा गहाळ दुवा मानला आहे. 2019...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

0
अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

0
मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची  मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी   मनमाड(प्रतिनिधी) : - मनमाड शहरात नगरपरिषदेच्या वतीने सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम वेगाने राबवली जात...

नोएडा आयटी फर्म ThynkTech ने पुणे कार्यालय बंद केल्याने 500 बेरोजगार; सीईओला अटक, सरकारी...

0
पुणे: ThynkTech India OPC Ltd चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे - नोएडा-आधारित आयटी फर्म ज्याने 22 एप्रिल रोजी कोणतीही सूचना न...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: महिलेने धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्याच्या...

0
एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...
error: Content is protected !!